रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

मौला..
अदभूतच ! उन्मदावस्था या दोन्ही जगात...., स्वच्छंदी हो
या स्वप्नपूर्तीत या श्रीमंतीतच जागृत होउन जा ...
उघडली जेव्हा हृदयाची नयने हे दुखी माणसा
तर ती न पाणावली न धुंद राहिली..
होती नवलाई अशी काही डोळ्यांवर
निष्प्रभ हेच प्रभावरहित राहिले..
पडली निष्प्राण कानांवर दयाळू अजब साद...
की हृदयाचा ठोकाच चुकला....
खबर ही विस्मयकारक प्रेमाची ऐक
ना उन्माद राहिला ना आतुरता राहिली...
ना की तू राहिलास ना की मी राहिलो..
जे राहिले ते निर्भ्रम राहिले..

मला धुंदी तू, भलताच साखरेचा पाक (गोडवा) चाखवलास
कोणत्याच इच्छेची मनात नाही आता, खंत सामावतेय..

ना भय आहे ना संकट आहे, न अभिलाषा (आज्ञा) आहे न विनंती (प्रार्थना) आहे
नाही विचारांचे बंदिस्त हे जग आहे, नाही इच्छा-कामनांनी बरबटलेले हे जग आहे...

न संधीची (परिणामांची) चर्चा आहे, न सवलतीचा (कारणांचा) शोध आहे..
ना की तिथे पाचही जाणीवा पोहोचतात, ना चातुर्याला प्रवेश आहे.. (वाव असतो)

नाही वसणारा आहे इथे नाही वस्ती आहे...न जमीन आहे इथे न संसार आहे...
कंगाल हृदयाने माझ्या तिथे छावणी ही वसवली...

न मिलन आहे न विरह...न उत्कंठा आहे न खेद आहे...
ज्यात असते बेसावध स्वप्न, अशी निज मला ही आली..

- हजरत शाह नियाज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...