मरासिम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मरासिम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

फुलपाखरू

घेरणारे वादळ .........
त्याला छेदणारे पावसाचे थेंब
आणि मी भांबावलेल्या आठवांनी तुझ्याशिवाय..
तसं....; फुलपाखरू मला येऊन समजावते दु:ख तुला कशाचे
मी अबोल मातीकडे पाहतोय.. भिरकावून घेतोय कोणाकडून..
छाती थरथरते माझी फुलपाखराच्या निघण्याने
परका नसलो तर सांगितले असते क्षणभरात मी
उडी घेऊन निजलो होतो त्या पाण्यातच....
फिरून आलो त्यासमच उद्वेगाने..तुला भेटायला परिपूर्ण बुद्धिरूपाने
बस... ते फुलपाखरू शरीर मजला नाही आता.............. 

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

मरासिम

दोन दिवसापूर्वी एकजण फार दिवसांनी भेटला आणि मग उडत-उडत काही तरी उत्तरं देत सटकलो..

भन्नाट (unexpected) प्रकारास असे सामोरे गेले तर माळलेली फुले शेवटी मावळून हातात बेदरकारपणे उरून जातात तसे मला होते..(काय फालतू कल्पना)
त्यात सजावटीने ल्यालेला प्रभाव खिन्नपणे विलसत राहतो.(bouncer)
खरं तर मला सुचत नाही या वेळेस काय करावे ते, बरं समोर असणारी व्यक्ती गर्दीच्या वेळेत भेटत असते मग कारण सांगायला परवडत असतं. (हे सांगण्यात point काय?)

मग मरासिम च्या मूड मला सुचतं.. (आठवतं कोणी तरी लिहिलेलं..) 
तेज हवा ने मुझसे पूछा
रेत पे क्या लिखते रहते हो
(कोणती तरी हवा भन्नाट पळत असते आणि सोबत मला विचारतेही?!!
कि वाळू वर मी काय लिहतोय?? मी आणि वाळू काय संबंध !!!!)

तर असो!
मी पुढे blog ला कुठे नेऊन ठेवणार आहे ते माहित नाही पण कुठे आणि कसं नेऊन ठेवायचं याचा प्रयत्न नक्की करणार आहे.

yogeshjoshi-yog.blogspot.com
to
marasimhisahi.blogspot.com 

शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

संवाद

मी जगलेला अंधार दरीत दिसेल हे माहित नव्हते. 
सारून प्रकाश मी तिथे असेल हे माहित नव्हते. 
जडलेले नाते होते; सडून जाणारा वारा खोल कसा तरी खुपायचा, मारायचा असंबद्ध..
मारलेली खून कुणी कशी जपायची; तो कुठे जाऊ द्यायचा..
अन्याय्य होता कि नसलेल्या न्यायाने मी जगत होतो?
संवाद भरपूर होतो रात्रीच्या काळोखात आणि कोठे सापडलेल्या अंधारातही.. न अधांतरी जड पूर्णजड गोठलेला; रुतायचा फार खूप दिशाहीन करून टाकायचा.. न आवडता फुलायचा दूर अनोळखी तो संवाद.. हो संवादच मला हवाहवासा....
तोच प्रत्येक मनातला ओरखडा मी पाहिला दरीत मला कल्पना नसताना... एकाकी असताना...
होताच नक्की तिथे कोणी मी असलेला.... न दिसणारा मी आणि
त्याच्या भविष्यातला त्याला जाणवणारा, पाहणारा त्याचा आताचा मी.. यात आता प्रत्यक्ष संवाद....

रविवार, १८ सप्टेंबर, २०११

सछंद

सछंद 
विरहाने व्यापलेला
हिरवट लपेटून उनाडणारा
निळ्या आकाशात किरमिजी हातात घेऊन
गुलाबी चेहर्‍याचा तो सछंद सा..षड्ज..  
फिकटलेल्या रंगांच्या अवकाशात रक्ताळलेला सूर व्यापतोय..

 

शनिवार, २० ऑगस्ट, २०११

दोन वर्षे नाही म्हटले तरी होत आले..
जरा थांबून मी गर्दीत हरवलेला कानोसा घेत आहे.. 
मागचा एक वर्षाचा माळ पालथा घातला आहे म्हणता म्हणता..
पुरता व्यक्त न झालेलो मी, न तुम्हाला ओळखू देणारा मी, आज थोडे थांबायचे म्हणतो आहे..

शुक्रवार, २० मे, २०११

सबकी सुनकर चुप रहते हैं.. दिल की बात नहीं कहते..
आते आते जीने के भी लाख बहाने आ जाते हैं..

मुनीर नियाज़ी  यांची अर्थपूर्ण रचना..मेहदी हसनचा स्वर
पण, खर आज मृगनयना रसिक मोहिनी ..ची मोहिनी जीव सावरतेय.. 

या दोन निराळ्या अर्थाने असलेल्या गीतांचा संगम या एका मनात..
आणि नसेल ही क्षणात हा..

अगम्य परिभाषेतून निपजलेल्या सारभूत वाक्यातला शब्द न शब्द इथे राहिलेला..
तगमग सर्व जीवांची झरणारा स्वर-गंधित ...शापित..नश्वर..आणखी काय..

कबिरांचे दोहामय जग, सुफींचा निर्लेप आलाप आणि मराठीजनांची निस्सीम निश्चित स्वरावणी.. 
शब्द न शब्दांनी बनवलेले वातावरण ..त्यात जीवार्त ओतलेला स्वर न स्वर..

निरामय विश्वाची केवळ ओळख ही...
आणि नसेल ही ह्या ज्ञात विश्वाची पुसटशी चिंता.. केवळ या जगभरून मरण्याच्या घडामोडींत..



....
...
.

गुरुवार, १० मार्च, २०११

तसंच काहीसं...

    मिट्ट उजेडामध्ये
     डोळ्यांनी निजून जावं
      तसंच काहीसं...
     दिसल्या खुणेस साक्ष
    देऊन निघून जावं

   मिणमिणता दिवा नसावा
  मनातला
     तसंच काहीसं...
    झोडपणारा पाऊस नको  
 उरातला

   जादू नजाकतीत ही,
  सही ठरलेली
     तसंच काहीसं...
    कुठे ही पडो मी,
  ही वेळ न ठरलेली

रविवार, ९ जानेवारी, २०११

उमदेपणाचे धूड सर्वस्वी मिरवावे
मरतेपणाचे लूट मनस्वी अर्पवावे

कास धरून तप्त नजर लाभावी
रोष पावून जप्त गरज भागावी

बरळत अबोल मनाची भाषा
गरळत अखोल जगाची ल्हाषा

उल्हास मरेपर्यंत...

शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

धूप कितनी....

पावसाळा आभाळात संध्याकाळी आपला ऋतुमय सोहळा उधळत असतो...
मनात पुढील ओळी सरावुन जातात..
"धूप कितनी तेज हो लेकिन सँवर जाएगी शाम,
उसके पलकों के तले छू ले निखर जाएगी शाम..."
श्रावण सर बरसावी.. तश्या हलक्या स्वरात हरिहरन गात असतो..
जसा झरा निखळ हास्य करत असतो..
रखरखीत ऊन छळत असेल तर, रंग छटा एक-एक सजवत संध्याकाळ खुलत येणारी असते...  
हे नक्कीच

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

रंजिश ही सही...

रंजिश ही सही...या गझलेतील ओळ आहे ...
"पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो..
रसमो-रहे दुनिया ही निभाने के लिये आ.."
  मेहदी हसन अतिशय सुबक पेश करतो..यातील रसम चा अर्थ आहे सोपस्कार..
जगभरातील अलिखित नियमांकरता 
आणि आपल्यात कधीही न बांधले गेलेले नाते या..गोष्टींकरता तरी ये...
चुणूक भर नजर जुळल्यावर मनात झंकारणारे सरगम.. यात कसले आले नाते-संबध.
पण जगरहाटीचे चार संदर्भ माहित असतील ..तर तू नक्की येशील.

blog विश्वात असच संचारणारा मी ... मनातील सरगम सुरात पेश करण्याचा प्रयत्न करतोय..
मरासिम बांधण्याचा.. प्रयत्न.
या एक वर्षात दिसलेली क्षणिक-चुणूक अशी भेट मला खूप भावली..त्याकरता सर्वांचे आभार..    

रविवार, ११ जुलै, २०१०

नाहीतर असा बाजूला जाऊन संकोचला का असता?

नाहीतर असा बाजूला जाऊन संकोचला का असता?

पण लाभलेला वक्राकार विस्तीर्ण सागर लुभावत असेल का त्याला अस दूर जाऊन......?
द्वारकेला नसलेला मागमूस का शोधत असेल तिथे पलीकडे?
विश्वधराचा रथ सकळ सुव्यस्थित ओढायला तो मार्ग, ते वळण, तो परिसर, तसं वातावरणच निश्चित असेल!
सह्याद्रीची ना कडेकपार योग्य त्या वळणात, ना तिथला मेघ बरसून टाकणारे वातावरण आणि वारकरी संपद्राय ही .....एकाचवेळी!

कदाचित पुरीच्या किनारी इंद्रधनुष्य उभारून..... द्वारकेत,आपला असलेला एकेकाळचा सुवर्णयुग परिवर्तीत करत असेल.

आणि एक...
तो तर जगत नाथ झालेला..ठाकूर होऊन बसलेला .......
तो तरी का समजून घेईल कडे-कपारीची समृद्ध भागवताची भाषा.. लाल माती काळ्या खडकावर का सजेल?
आणि पुरीच्या नाथाला विठ्ठलाची कास धरता येत नसेल ... वैकुंठ असे जे सजवलेले ...न तिथे रखुमाईला जवळीक, केवळ भक्तमय असलेला तो
गंगा येत यावी गोदेला तप-तपाने भेटायला ...दक्षिण काशी सजवायला!


मेघ झरझर बरसून धरतीला निनादून टाकणारे वातावरण तर सारखेच.... त्या तिथे आणि इथेही

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१०

तो वेडावला होता ..त्याच्या नजरेचा स्पर्श निरंतर जपत होता
काही काही क्षण सुन्न झालीत का? कशी? प्रश्न पडले होते ..
त्याचे दुरून चालणारे गुंजन खोलवर साठवत होता..
त्याच्या हसण्यात चमकणारी लकब त्याला सदैव छळत होती..
त्याला आतून जाणवत होते की तो त्याचा खूप जवळचा होता...


पण एक दिवस मात्र हे सारे काही निसटून जाणार होते...
कारण त्यांना एकमेकांची ओढ निर्माण करणारी नाळ नष्ट होणार होती..






तो ..तो झरा आणि त्यात गुंतलेला तो वारा..
आणि ती पृथ्वी माताची नाळ ... नष्ट करणारा तो अनेकविध प्रदूषण 

गुरुवार, ३१ डिसेंबर, २००९

बंध-ए-कलाम

1.Where is your cell phone?
Dead
2.Your hair?
Black
3.Your mother?
मर्मज्ञ
4.Your father?
सर्वज्ञ 
5.Your favorite food?
पूर्णब्रह्म
6.Your dream last night?
Enjoying Howrah Bridge @kolkata 
7.Your favorite drink?
H2O
8.Your dream/goal?
 Out off Goal
9.What room are you in?
Roaming on Earth
10.Your hobby?

 
11.Your fear?
 Nothing
12.Where do you want to be in 6 years?
Anywhere!
13.Where were you last night?
 Dreamworld
14.Something that you aren’t?
Narrow minded
15.Muffins?
Black Forest
16.Wish list item?
All your Blogs (Bloggers cheer up!) 
17.Where did you grow up?
On playground
18.Last thing you did?
 Saw mandar's blog got deleted.
19.What are you wearing?
बरपा बरगश्तगी -ए- किस्मत
20.Your TV?
Pass
21.Your pets?
 Honest
22.Friends?
All over the World
23.Your life?
;)
24.Your mood?
Any guess?
25.Missing someone?
.
26.Vehicle?
Running
27.Something you’re not wearing?
नकाब -ए- मातम
28.Your favorite store?
My heart
29.Your favorite color?
Is Holi Joy 
30.When was the last time you laughed?
Ohh its impossible query!
31.Last time you cried?
For your sake... now : (
32.Your best friend?
All you!
33.One place that you go to over and over?
Mt. Everest!(of all things except existing Mt.)
34.One person who emails me regularly?
Don't know!
35.Favorite place to eat?
 Jaipur

यानंतर बंध-ए-कलाम (Tag-ए-Conversation) असेल
अभि
अश्विन
आदित्य
अभिजित
RAJ
Yawning Dog
१८ Anup Barve
२३ Anup Dhere 

शेवटी या 'योगायोगा'ला 'बंध'नात गुंफल्याचे श्रेय जाते...
*मीनल* यांना 


मंगळवार, ७ जुलै, २००९

भय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही...
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो..
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविले गीते..

भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही...

ते झरे चंद्र सजणांचे
ते झरे चंद्र सजणांचे..
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांशी निजलो आपण..
झाडांत पुन्हा उगवाया

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..
भय इथले संपत नाही....

तो बोल मंद हळवासा
तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला...
सीतेच्या वनवासातील
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला ..

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..
भय इथले संपत नाही....

स्त्रोतात इंद्रिये अवघी..
स्त्रोतात इंद्रिये अवघी
गुणगुणती दुख कुणाचे
हे सरता संपत नाही
हे सरता संपत नाही....
चांदणे तुझ्या स्मरणाचे

भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते...

मी संध्याकाळी गातो..
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविले गीते..

भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही

- ग्रेस
Related Posts Plugin for WordPress, Blogger...