आल्हाद, मुराद आणि दयार्द लेणी अजूनही आखलेली बहुदा रेखाटलेली होती. कलाकारांपैकी कौशल आणि कैवल राहण्यासाठी मानलेल्या नात्यांवर विसंबून होती. मनाचा पसारा विस्तृत असल्याने माजलेली संभ्रमावस्था निपटून काढत सौंदर्यस्थळे निर्माण करणे हा मुख्य उद्देश होता. या मनात कोणता ऋतू कधी येईल आणि कधी जाईल हे निश्चित सांगता येत नव्हते. हवामान क्षणोक्षणी अस्थिर आणि बदलणारे होते. कैवल सूर विश्वात रमायचा. त्याचे बंद आडाखे बंदिशीतून दिसून येत. दयार्द लेण्यात तो मंदपणे विहारायचा. तोच कौशल मर्म पूर्ण करण्यात धन्यता मानायचा, मग तो छंद बंधित राहणे असो किंवा लेणी रचणे असो. आल्हाद लेणे विशाल व्यापक आणि या दोन जनांस रुचीपूर्ण होते. मुराद कौशलला रंगमय वाटत असे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा