रविवार, ११ जुलै, २०१०

नाहीतर असा बाजूला जाऊन संकोचला का असता?

नाहीतर असा बाजूला जाऊन संकोचला का असता?

पण लाभलेला वक्राकार विस्तीर्ण सागर लुभावत असेल का त्याला अस दूर जाऊन......?
द्वारकेला नसलेला मागमूस का शोधत असेल तिथे पलीकडे?
विश्वधराचा रथ सकळ सुव्यस्थित ओढायला तो मार्ग, ते वळण, तो परिसर, तसं वातावरणच निश्चित असेल!
सह्याद्रीची ना कडेकपार योग्य त्या वळणात, ना तिथला मेघ बरसून टाकणारे वातावरण आणि वारकरी संपद्राय ही .....एकाचवेळी!

कदाचित पुरीच्या किनारी इंद्रधनुष्य उभारून..... द्वारकेत,आपला असलेला एकेकाळचा सुवर्णयुग परिवर्तीत करत असेल.

आणि एक...
तो तर जगत नाथ झालेला..ठाकूर होऊन बसलेला .......
तो तरी का समजून घेईल कडे-कपारीची समृद्ध भागवताची भाषा.. लाल माती काळ्या खडकावर का सजेल?
आणि पुरीच्या नाथाला विठ्ठलाची कास धरता येत नसेल ... वैकुंठ असे जे सजवलेले ...न तिथे रखुमाईला जवळीक, केवळ भक्तमय असलेला तो
गंगा येत यावी गोदेला तप-तपाने भेटायला ...दक्षिण काशी सजवायला!


मेघ झरझर बरसून धरतीला निनादून टाकणारे वातावरण तर सारखेच.... त्या तिथे आणि इथेही

२ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...