गुरुवार, १६ जून, २०११

रात्र

मनस्वी स्वीकार
मनाचा नव्हता ...
निसर्गाने आव आणला होता.. म्हणून नाटक होते ते..
चिता जळून जातांना नर्मदा आज सरकत नाही तीरावर.. तिलाही नाटकीपणाचा तिटकारा असावा..
भडभडत्या आगीत एक जीव शांत होता ..नाटकातला..
शीतल मधुर चांदणे होते त्याच्या चहूकडे..पण तो आगीत होता..नट होता तो सूर आळवणारा..
हा सुर नर्मदेच्या तीरावरचा.. इथल्या चांदण्यांचा खच.. मिळालेला ताल त्यात मिणमिणता..
  सृजनाची नांदी हीs...
  मन-सागर हा सखा..
आठवणींचा साज आवाजाला..खदखद मनातली आगेतून विरून जात होती.
त्यानंतर..
सूर्याची सुरावट सकाळी सुरु सुरळीत ..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...