मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

गूढ

परस्पर जीवांचे स्वप्न अंतर्धान पडू लागते. फेर सहज विशालकाय होऊ लागतो. मनाला पटेल असे गूढ बनू लागते.

कळीची ताटातूट होऊ नये यासाठी चंद्र किरणे पहाटे गलबत झिरपून ठेवतात; सूर्य किरणास अवधी अजून त्या गलबताभोवती पाणी भरण्यास तर इतक्यात कोणी कळीच्या रोख्याने येत जावे आणि न व्हायची ताटातूट व्हावी.

सखीच्या असंख्य प्रश्नांना कृष्ण हे एक उत्तर असावे. तिलाही न पडणारे असंख्य प्रश्न, त्यांनाही कृष्णमात्र उत्तर असावे.

नदीची तगमग न कधी जाणवणारी आपल्याला, जलमय जीवनात तिचे स्वतःचे अश्रू किती वाहत असतात आणि सोबत तिच्या आयुष्याचा भाग असणारे जल त्यात किती मिसळून जात असते याचा अंदाज कोणाला येत असावा.

या कळी, सखी आणि नदी ची साखळी माझ्या मनात डोकावू लागते आणि गूढ सुटता सुटत नाही....
अर्थ मिळता मिळत नाहीच...

२ टिप्पण्या:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...